AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्राची समृद्धी की शाप? समृद्धी महामार्गानं वेग वाढला पण लोकांची जीवनरेषा घटली?

महाराष्ट्राची समृद्धी की शाप? समृद्धी महामार्गानं वेग वाढला पण लोकांची जीवनरेषा घटली?

Harshada Shinkar
Harshada Shinkar | Updated on: Oct 16, 2023 | 11:03 AM
Share

tv9 marathi Special Report | मुंबई आणि नागपूर अवघ्या ८ तासांवर आणणाऱ्या समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात झालाय. महामार्गावरील भीषण अपघातांची मालिका सुरूच, अपघातावरून विरोधकांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका

मुंबई, १६ ऑक्टोबर २०२३ | मुंबई आणि नागपूर अवघ्या ८ तासांवर आणणाऱ्या समृद्धी महामार्गावर पुन्हा एक भीषण अपघात झालाय. यामध्ये १२ जणांचा अपघात झालाय. अपघातानंतर समृद्धीवरून राजकारणही तितक्याच वेगानं सुरू आहे. नाशिकमधील प्रवासी बुलढाण्याहून सैलानी बाबाचं दर्शन घेऊन परतत होते. याच वेळी रात्री साडे १२ वाजता छत्रपती संभाजीनगर वैजापूर येथे समृद्धी महामार्गावर एका आरटीओच्या गाडीने ट्रक आडवला. ट्रकने अचानक ब्रेक मारला ही ट्रक बाजूला होत असतानाच मागून आलेल्या टेम्पो ट्रॅव्हलरनं जोरदार धडक दिली. या धडकेने झोपेत असलेले प्रवासी समोरच्या बाजूला फेकले गेले आणि या गाडीचा चक्काचूक झाला, हा प्रसंग प्रत्यक्षदर्शीने सांगितली. यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी घटनास्थळावर धाव घेतली. यानंतर सरकारकडे काय केली मागणी? बघा स्पेशल रिपोर्ट

Published on: Oct 16, 2023 11:00 AM
Follow Us