AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कळवा रूग्णालयातील 'त्या' दुर्घटनेनंतर कल्याणमध्ये भाजप आक्रमक, रुक्मिणीबाई रुग्णालय प्रशासनाकडे काय केली मागणी?

कळवा रूग्णालयातील ‘त्या’ दुर्घटनेनंतर कल्याणमध्ये भाजप आक्रमक, रुक्मिणीबाई रुग्णालय प्रशासनाकडे काय केली मागणी?

| Updated on: Sep 04, 2023 | 3:03 PM
Share

VIDEO | कळवा रुग्णालयात झालेल्या दुर्घटनेनंतर भाजपचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष वरुण पाटील यांची कल्याणमधील रुक्मिणीबाई रुग्णालयाला भेट, आवश्यक औषधांचा तुटवडा आणि डॉक्ट्रांची जागा भरून काढण्याची प्रशासनाकडे केली मागणी

ठाणे, ४ सप्टेंबर २०२३ | कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात घडलेल्या दुर्घटनेसारखे कल्याणमध्ये लोकांचे जीव जाऊ नये यासाठी कल्याण रुख्मिणीबाई रुग्णालय किती सज्ज आहे, हे पाहण्यासाठी भाजपचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष वरुण पाटील यांनी आज अचानक रुग्णालयाची पहाणी केली. कल्याण डोंबिवलीकर डेंग्यू, मलेरिया यासह साथीच्या विविध आजारांनी त्रस्त झाले आहेत. रुक्मिणीबाई रुग्णालयात डेंग्यू आणि मलेरिया झालेले रुग्ण मोठ्या संख्येने आढळून आले आहेत. मात्र या आजारांच्या उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या औषधांचा तुटवडा आणि डॉक्ट्रांचीही कमतरता जाणवत असल्याचा आरोप पाटील यांनी केला. तर राज्यामध्ये आमचेच सरकार असून कल्याण पश्चिमेत सुसज्ज रुग्णालय होण्यासाठी आपण शासन स्तरावर पाठपुरावा करत असल्याचे त्यांनी सांगतिले. यावेळी आवश्यक औषधांचा तुटवडा आणि डॉक्ट्ररांची जागा भरून काढण्याची अशी मागणी प्रशासनाकडे करणार असल्याचे सांगितले.

Published on: Sep 04, 2023 03:01 PM