Air India Plane Crash : ‘त्या’ 10 मिनिटांमुळे आज जिवंत, गुजरातच्या तरूणीनं सांगितलं तिच्यासोबत काय घडलं?
गुजरातमधील भरूच येथील रहिवासी भूमी चौहान दोन वर्षांनी सुट्टीसाठी भारतात आली होती. गुरुवारी अपघात झालेल्या एअर इंडियाच्या विमान एआय-१७१ ने तिला लंडनला परतायचे होते, मात्र काही कारणामुळे ती वेळेवर विमानतळावर पोहोचू शकली नाही, ज्यामुळे तिचा जीव वाचला.
गुजरातमधील भरूच येथील रहिवासी भूमी चौहान हिलाही एअर इंडियाच्या विमान AI-171 ने लंडनला जायचे होते, परंतु ती सरदार वल्लभभाई विमानतळावर 10 मिनिटे उशिरा पोहोचली. हे तेच विमान होते जे नंतर क्रॅश झाले होते, ज्यामध्ये क्रू मेंबर्ससह 242 प्रवाशांपैकी 241 जणांचा मृत्यू झाला होता. विमान अपघातातून वाचलेल्या भूमीने तिचा अनुभव सांगितला.
अहमदाबाद विमानतळावर पोहोचण्यास १० मिनिटे उशीर झाला म्हणून भूमी चौहान आज जीवंत आहे. भूमी चौहान गुरुवारी एअर इंडियाच्या विमान एआय-१७१ ने प्रवास करणार होती. मात्र ती फ्लाईटच्या वेळेवर पोहोचू शकली नाही. एका वृत्तसंस्थेला माहिती देताना ती म्हणाली, वाहतूक कोंडीमुळे विमानतळावर पोहोचण्यास उशीर झाला. त्यामुळे तिला विमानात चढू देण्यात आले नाही. दरम्यान, तिचा जीव वाचल्यानंतर भूमीने देवाचे आभारच मानले. तिने सांगितले की मी सुरक्षित आहे, पण विमान अपघात हृदयद्रावक आहे.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय

