AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report | अजितदादांच्या शब्दाला किंमत आहे की नाही?-TV9

Special Report | अजितदादांच्या शब्दाला किंमत आहे की नाही?-TV9

| Edited By: | Updated on: Jan 14, 2022 | 9:14 PM
Share

ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला की प्रताप सरनाईक आमच्या शिवसेनेचा आमदार आहे, म्हणून त्यांची चोरी, गुन्हे माफ. ठाकरे सरकार हे प्रताप सरनाईक यांना माफ करणार. परंतु महाराष्ट्राची जनता या घोटाळेबाज सरकारला कदापी माफ करणार नाही”, अशा शब्दात सोमय्या यांनी शिवसेना आणि ठाकरे सरकारवर टिकास्त्र डागलं.

मुंबई : भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आमदार प्रताप सरनाईकांवरुन (Pratap Sarnaik) पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi) जोरदार निशाणा साधलाय. “ठाण्यातील विहंग गार्डनचे अनधिकृत बांधकाम करणारे, 114 सदनिका धारकांची फसवणूक करणाऱ्या शिवसेना आमदार प्रताप सरनाईक चे गुन्हे माफ करण्याचा ठाकरे सरकारने निर्णय घेतला असेल, परंतु महाराष्ट्राला लुटणाऱ्या ठाकरे सरकारला जनता कदापि माफ करणार नाही”, अशा शब्दात सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर टीका केलीय.

सोमय्या यांनी एक पत्रक काढून ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय. “शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी 2008-2009 मध्ये ठाणे विहंग गार्डन येथील 114 सदनिकाधारकांची फसवणूक केली. 5 मजले अनधिकृत बांधले. 2012 मध्ये प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश आहे. गेल्या आठवड्यात लोकायुक्तांच्या समोर झालेल्या सुनावणीत ठाकरे सरकारने मान्य केले की प्रताप सरनाईक यांनी अनधिकृत बांधकाम केले आहे. त्यांच्याकडून सगळा दंड आणि व्याज वसूल केले जाणार, त्यांच्यावर कारवाई केली जाणार आणि आज ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला की प्रताप सरनाईक आमच्या शिवसेनेचा आमदार आहे, म्हणून त्यांची चोरी, गुन्हे माफ. ठाकरे सरकार हे प्रताप सरनाईक यांना माफ करणार. परंतु महाराष्ट्राची जनता या घोटाळेबाज सरकारला कदापी माफ करणार नाही”, अशा शब्दात सोमय्या यांनी शिवसेना आणि ठाकरे सरकारवर टिकास्त्र डागलं.

Published on: Jan 14, 2022 09:14 PM