शिवसेनेच्या 4 मंत्र्यांना डच्चू मिळणार? अंबादास दानवे म्हणतात, “जैसी करनी वैसी भरनी”
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील 5 मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील 5 मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “जैसी करनी वैसी भरनी आहे. भारतीय जनता पार्टीची एक पद्धत आहे, स्वतः काय करायचं नाही मात्र एकमेकात भांडण करायला लावायचं.याचं कारण सध्या भारतीय जनता पार्टीला शिंदे गटातले काही आमदार जड झालेले आहेत. फार दिवस हे सरकार या 40 जणांना जवळ ठेवेल असं दिसत नाही. पाच नसतील मात्र दोघा-तिघांना काढू शकतात. दादा भुसे, अब्दुल सत्तार, या दोघांविषयी नक्कीच भारतीय जनता पार्टी नाराज असल्याचे कळते.फार दिवस या सरकारचा तमाशा नाटक चालणार नाही”, असं अंबादास दानवे म्हणाले.
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
