टायर फुटलाच नाही मग बुलढाणा बस अपघाताचे नेमकं कारण काय? आरटीओच्या अहवाल काय झालं उघड?
सिंदखेडराजा परिसरात पिंपळखुटा येथे झाला. तर त्यात 25 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती देताना बसचं टायर आणि डिझेलची टाकी फुटल्याने आग लागली आणि त्यातच 25 जणांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं होतं. पण आता आरटीओच्या अहवालात धक्कादायक बाब समोर आली आहे
बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या समृध्दी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात झाला. हा सिंदखेडराजा परिसरात पिंपळखुटा येथे झाला. तर त्यात 25 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती देताना बसचं टायर आणि डिझेलची टाकी फुटल्याने आग लागली आणि त्यातच 25 जणांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं होतं. पण आता आरटीओच्या अहवालात धक्कादायक बाब समोर आली आहे. या अहवालात आणि ड्रायव्हरने दिलेल्या माहितीमध्ये तफावत आहे. ड्रायव्हरच्या म्हणण्यानुसार टायर फुटून भीषण अपघात झाला. मात्र आरटीओनं दिलेल्या अहवालात टायर फुटलाच नाही असं म्हटलं आहे. त्यामुळे आता हा अपघात नेमका कशामुळे झाला असा प्रश्न आता सगळ्याच्यांच मनात आला आहे. तर हा अपघात चालकाला डुलकी लागल्याने झाला असेल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..

