AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashish Shelar | 27 टक्के ओबीसी आरक्षणाचा राज्य सरकारच्या हेकेखोरीमुळे खून : आशिष शेलार

Ashish Shelar | 27 टक्के ओबीसी आरक्षणाचा राज्य सरकारच्या हेकेखोरीमुळे खून : आशिष शेलार

| Edited By: | Updated on: Dec 16, 2021 | 7:30 PM
Share

ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्द्यावरुन भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi Government) जोरदार हल्ले सुरु झालेत. ‘ठाकरे सरकारने दृष्टीआहिन, बुध्दीाहिन आणि दिशाहिन भूमिकेने ओबींसींच्या राजकीय आरक्षणाचा खून केला’, असा गंभीर आरोप भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केलाय.

मुंबई : ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्द्यावरुन भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi Government) जोरदार हल्ले सुरु झालेत. ‘ठाकरे सरकारने दृष्टीआहिन, बुध्दीाहिन आणि दिशाहिन भूमिकेने ओबींसींच्या राजकीय आरक्षणाचा खून केला’, असा गंभीर आरोप भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केलाय. तसंच ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण जात असताना मंत्री म्हणून छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार मंत्रीमंडळात कसे राहू शकतात?, असा खोचक सवालही शेलार यांनी केलाय.

ठाकरे सरकारच्या हेकेखोरपणामुळे स्थाानिक स्वाराज्य संस्थांमधील ओबीसींच्या 27 टक्केच आरक्षणाचा खून झाला. ज्या पद्धतीने 2019ला सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने निवडा देताना ट्रिपल टेस्टमध्ये खरा ठरणारा इंपेरिकल डाटा गोळा करा, असा आदेश दिला होता. मात्र, अहंकार आणि हेकेखोरपणा या सरकारने सोडला नाही. त्यानंतर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी 2019 ला सांगितले की, मागासवर्ग आयोग नेमा, इंपेरिकल डाटा गोळा करा, आरक्षणासाठी समथर्न कार्यपध्दीती करा. पण ठाकरे सरकारने काय केले तर इंपेरिकल डाटा केंद्र सरकारने द्यावा, जनगणननेची आकडेवारी केंद्र सरकारने द्यावी, साथीच्या काळात आम्हाला इंपेरिकल डाटा गोळा करणे शक्य नाही, असं वारंवार सांगत राहिले, अशी खोचक टीका शेलार यांनी केलीय.