“संजय राऊत यांची राजकीय किंमत शून्य”, भाजप नेत्याचा घणाघात
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात वारकरी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली.पालखी सोहळ्यातील वारकरी बांधवांवर पोलिसांनी लाठीमार केला. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. यावर भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांचा चांगलाच समाचार घेतला.
मुंबई : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात वारकरी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली.पालखी सोहळ्यातील वारकरी बांधवांवर पोलिसांनी लाठीमार केला. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. यावर भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांचा चांगलाच समाचार घेतला. भातखळकर म्हणाले, “औरंगजेबाचं रक्त कोणाच्या रक्तात आहे, हे जाऊन संजय राऊत यांनी अबू आझमी यांना विचारावे. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे औरंगजेबाचं गुणगान गात होते. संजय राऊत फुकटची बडबड करत आहेत त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही. संजय राऊत यांची राजकीय किंमत आता शून्य आहे. वारीमध्ये लाटीच्या झालाच नाही, हे उपमुख्यमंत्री यांनी देखील सांगितले. संत परंपरेचा राजकीय वापर करू नये.”
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले

