AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजय राऊत यांची राजकीय किंमत शून्य, भाजप नेत्याचा घणाघात

“संजय राऊत यांची राजकीय किंमत शून्य”, भाजप नेत्याचा घणाघात

apeksha sakpal
apeksha sakpal | Updated on: Jun 13, 2023 | 9:11 AM
Share

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात वारकरी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली.पालखी सोहळ्यातील वारकरी बांधवांवर पोलिसांनी लाठीमार केला. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. यावर भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांचा चांगलाच समाचार घेतला.

मुंबई : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात वारकरी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली.पालखी सोहळ्यातील वारकरी बांधवांवर पोलिसांनी लाठीमार केला. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. यावर भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांचा चांगलाच समाचार घेतला. भातखळकर म्हणाले, “औरंगजेबाचं रक्त कोणाच्या रक्तात आहे, हे जाऊन संजय राऊत यांनी अबू आझमी यांना विचारावे. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे औरंगजेबाचं गुणगान गात होते. संजय राऊत फुकटची बडबड करत आहेत त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही. संजय राऊत यांची राजकीय किंमत आता शून्य आहे. वारीमध्ये लाटीच्या झालाच नाही, हे उपमुख्यमंत्री यांनी देखील सांगितले. संत परंपरेचा राजकीय वापर करू नये.”

Published on: Jun 13, 2023 09:11 AM
Follow Us