“संजय राऊत यांची राजकीय किंमत शून्य”, भाजप नेत्याचा घणाघात
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात वारकरी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली.पालखी सोहळ्यातील वारकरी बांधवांवर पोलिसांनी लाठीमार केला. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. यावर भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांचा चांगलाच समाचार घेतला.
मुंबई : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात वारकरी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली.पालखी सोहळ्यातील वारकरी बांधवांवर पोलिसांनी लाठीमार केला. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. यावर भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांचा चांगलाच समाचार घेतला. भातखळकर म्हणाले, “औरंगजेबाचं रक्त कोणाच्या रक्तात आहे, हे जाऊन संजय राऊत यांनी अबू आझमी यांना विचारावे. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे औरंगजेबाचं गुणगान गात होते. संजय राऊत फुकटची बडबड करत आहेत त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही. संजय राऊत यांची राजकीय किंमत आता शून्य आहे. वारीमध्ये लाटीच्या झालाच नाही, हे उपमुख्यमंत्री यांनी देखील सांगितले. संत परंपरेचा राजकीय वापर करू नये.”
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर

