Special Report | जुनी प्रकरणं Raj Thackeray यांच्या अडचणी वाढवणार?
औरंगाबाद सभेनंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर दोन गुन्हे दाखल केले गेले आहेत. त्यातच आता दोन अजामीनपात्र वॉरंट निघाले असून त्यांना अटक होणार का अशी चर्चा आहे.
औरंगाबाद सभेनंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर दोन गुन्हे दाखल केले गेले आहेत. त्यातच आता दोन अजामीनपात्र वॉरंट निघाले असून त्यांना अटक होणार का अशी चर्चा आहे. भोंग्याच्या वादावरुन अडकेलेले राज ठाकरे आता कायद्याच्या कचट्यातही सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. औरंगाबादच्या सभेनंतर आतापर्यंत राज ठाकरे यांच्या दोन अटक वॉरंट निघाले आहेत. पहिले वॉरंट सांगलीतील शिराळा न्यायालयाने तर दुसरं वॉरंट परळी न्यायालयाने काढले आहेत. परप्रांतीयांवर हल्ले आणि एसटीवर केलेल्या हल्ल्यामुळे त्यांच्यावर सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि चिथावणीखोर वक्तव्यांबाबत गुन्हा दाखल केले गेले आहेत. त्यांच्यावर न्यायालयात वेळेवर हजर राहिले नसल्यामुळेही त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आले आहे. न्यायालयात सतत गैरहजर उपस्थित राहिल्याने त्यांच्यावर अटकेची कारवाई होणार का हे आता येणारा काळच ठरणार आहे.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज

