तुम्ही शेळी, कुत्रे, मेंढी झालात, तुम्हाला बोलायचा अधिकार नाही; सावंत आणि राऊत यांचा शिवसेना नेत्याकडून समाचार
सावंत आणि राऊत यांच्यावर टीका करताना संजय गायकवाड म्हणाले, ‘महाराष्ट्रातले खरे वाघ कोण? कोल्हे, कुत्रे, लांडगे कोण आहेत? हे महाराष्ट्रातील जनता जानते. आम्ही गेली 35 वर्षे वाघासारखे जगलो
बुलढाणा : बाबरी मशीदवरून भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वक्तव्य केल्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून टीका करण्यात आली होती. खासदार संजय राऊत आणि खासदार अरविंद सावंत यांनी शिंदे गटावर निशाना साधत टीका केली होती. त्यावर आता शिवसेना नेते संजय गायकवाड यांनी प्रतिहल्ला चढवत टीका केली आहे.
सावंत आणि राऊत यांच्यावर टीका करताना संजय गायकवाड म्हणाले, ‘महाराष्ट्रातले खरे वाघ कोण? कोल्हे, कुत्रे, लांडगे कोण आहेत? हे महाराष्ट्रातील जनता जानते. आम्ही गेली 35 वर्षे वाघासारखे जगलो. खऱ्या अर्थाने ज्यांचा शिवसेनेशी संबंध आला नाही, तेच लोक आता वाघाचे पांघरून बसलेत. आम्ही कुठेही गेलो नाहीत. गेले ते शेळ्या मेंढ्यांच्या कळपात. आमचा वाघाचा कळप स्वतंत्र आहे. आम्ही कोण्या कळपात गेलो नाही. अरविंद सावंत, राऊत असतील हे काँग्रेस राष्ट्रवादीच्या कळपात जाऊन तुमचा वाघ विसरले. तुम्ही शेळी, कुत्रे, मेंढी झालात, तुम्हाला बोलायचा अधिकार नाही, अशा शब्दात संजय गायकवाड यांनी सुनावलंय.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

