बेताल वक्तव्य करणाऱ्यासंभाजी भिडे यांच्यावर बच्चू कडू संतापले; म्हणाले…
संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर आक्षेपार्ह विधान केलं आहे. त्यांच्या आक्षेपार्ह विधानानंतर राज्यभरातून निषेध व्यक्त जत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी संभाजी भिडे यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे.
अमरावती, 31 जुलै 2023 | संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर आक्षेपार्ह विधान केलं आहे. त्यांच्या आक्षेपार्ह विधानानंतर राज्यभरातून निषेध व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी संभाजी भिडे यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. ते म्हणाले की,”संभाजी भिडेंना बेड्या ठोकल्या पाहिजेत. तिरंग्याचा अपमान आम्ही सहन करणार नाही.हे जर थांबल नाही तर संभाजी भिडे विरोधात आम्ही रोखठोक भूमिका घेऊ, सहा महिने तरी भिडे यांना देशाच्या बाहेर ठेवल पाहिजे.या देशात महात्मा गांधींच नाही, तर वीर सावरकर यांच्या बद्दल देखील बोललं गेलं. राहुल गांधी सावरकर यांच्याबद्दल बोलले; आता भिडे यांनी महात्मा गांधींबद्दल चुकीच वक्तव्य केलं आहे. महापुरुषांवर टीका करताना आपली लायकी तपासली पाहिजे. संभाजी भिडे यांचं स्वातंत्र्यामध्ये योगदान काय आहे, कधी लाठी तरी खाल्ली का अशाप्रकारे बोलत असेल तर त्यांच्या नांग्या तिथेच ठेचल्या पाहिजे. भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर बोलले पाहिजे.”
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

