Ratnagiri Barsu Refinery | 164 महिलांना टेबल जामीन, 37 पुरुषांचं भवितव्यावर आज न्यायलयात फैसला
बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या सर्वेक्षणावेळी स्थानिकांनी जोरदार विरोध केला. यावेळी आंदोलक येथे घुसले. यावरून पोलीसांनी आंदोलकांची धरपकड केली. तर अनेक महिलांचा समावेळ आहे.
रत्नागिरी : राज्यातील राजकीय वातावरण आता बारसू आंदोलनामुळे (Barsu Movement) चिघळले आहे. काल सरकारकडून आंदोलन करणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर आता विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर जोरदा हल्लाबोल केला जात आहे. बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या (Barsu Refinery Project) सर्वेक्षणावेळी स्थानिकांनी जोरदार विरोध केला. यावेळी आंदोलक येथे घुसले. यावरून पोलीसांनी आंदोलकांची धरपकड केली. तर अनेक महिलांचा समावेळ आहे. काल झालेल्या या झटापटीत पोलिसांनी 201 च्यावर आंदोलकांना ताब्यात घेतलं. त्यापैकी 164 महिलांना टेबल जामीन (Table Bail) देण्यात आला आहे. तर 37 पुरूषांना आज राजापूर पोलीस न्यायालयात हजर करणार आहेत. त्यामुळे बारसू रिफायनरी प्रकल्प मुद्दा पुन्हा एकदा चिघण्याची शक्यता आहे.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...

