Nitesh Rane : ‘2-3 टकले सोडले तर हे सरकार पूर्ण…’, नितेश राणेंचा रोख अजितदादांकडे? नेमकं काय म्हणाले?
हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपचे नेते नितेश राणे नेहमीच आक्रमक भूमिका घेताना दिसताय. अशातच नितेश राणे यांनी केलेल्या एका वक्तव्याने त्यांची चांगलीच चर्चा होताना दिसतेय.
दोन ते तीन टकले सोडले तर हे सरकार पूर्ण तुमचं… असं वक्तव्य भाजप नेते नितेश राणे यांनी केल्याचे पाहायला मिळाले. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटमधील हिंदू विराट सभेमध्ये नितेश राणे यांनी हे वक्तव्य केलं आहे. नितेश राणे यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर अजित पवार यांचा रोख हा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडे होता का? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होताना दिसतेय. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून केलेल्या नितेश राणेंच्या या वक्तव्यानंतर चर्चांना चांगलंच उधाण आल्याचे पाहायला मिळतंय.
काय म्हणाले नितेश राणे?
‘हिंदू म्हणून हिंमतीने आणि अभिमानाने महाराष्ट्रात राहा. तुम्हाला पाहिजे तिथे भगवा फडकवा.. तुम्हाला काहीही होणार नाही. याची जबाबदारी हा नितेश राणेंची आहे. काही चिंता करू नका… दोन-चार टकले सोडले तर हे सरकार हे पूर्ण तुमचं आहे.’, असं नितेश राणे म्हणाले.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

