Air Pollution : वायू प्रदूषण रोखण्यासाठी BMC ची शक्कल, मुंबईचे रस्ते पाण्यानं धू-धू धुतले

प्रदूषण नियंत्रणासाठी पालिकेने रस्ते, वर्दळीचे फुटपाथ धुवून काढण्याचे नियोजन केलंय. धूळ नियंत्रणासाठी 121 टँकरसह इतर संयंत्रांचा वापर करण्यात येणारेय. 60 फुटांपेक्षा अधिक रुंदीचे रस्ते, वर्दळीचे फूटपाथ स्वच्छ करून ते पाण्याने धुण्यास सुरुवात झालीये.

Air Pollution : वायू प्रदूषण रोखण्यासाठी BMC ची शक्कल, मुंबईचे रस्ते पाण्यानं धू-धू धुतले
| Updated on: Nov 05, 2023 | 5:17 PM

मुंबई, ५ नोव्हेंबर २०२३ | गेल्या काही वर्षांत मुंबईतील वायू प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झालीय. हिवाळा सुरु झाला की हवेची गुणवत्ता सतत खालावत असल्याचं समोर आलंय. सातत्याने खालावत चाललेल्या हवेच्या गुणवत्तेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय. त्यामुळे मुंबई महापालिका विशेष उपाययोजना राबवत आहे. प्रदूषण नियंत्रणासाठी पालिकेने रस्ते, वर्दळीचे फुटपाथ धुवून काढण्याचे नियोजन केलंय. धूळ नियंत्रणासाठी 121 टँकरसह इतर संयंत्रांचा वापर करण्यात येणारेय. 60 फुटांपेक्षा अधिक रुंदीचे रस्ते, वर्दळीचे फूटपाथ स्वच्छ करून ते पाण्याने धुण्यास सुरुवात झालीये. रस्ते आणि फुटपाथांवरील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी महापालिकेकडून धूळ प्रतिबंधक यंत्राचा वापर करण्यात येतोय. मुंबईतील वायू प्रदूषण आणि धूळ नियंत्रणासाठी महापालिका प्रशासनानं पावलं उचलावीत, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्या अनुषंगाने वायू प्रदुषणावर उपाययोजनांसाठी अतिरिक्त मनपा आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक पार पडली होती. यात वायूप्रदूषण रोखण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांबाबत चर्चा झाली.

Follow us
गुणरत्न सदावर्ते यांचं आरक्षणावर मोठं वक्तव्य, डंके की चोट पर मला....
गुणरत्न सदावर्ते यांचं आरक्षणावर मोठं वक्तव्य, डंके की चोट पर मला.....
पोकळ घोषणांचा धूर,यंदाचं हिवाळी अधिवेशन वादळी? विरोधकांची बॅनरबाजी काय
पोकळ घोषणांचा धूर,यंदाचं हिवाळी अधिवेशन वादळी? विरोधकांची बॅनरबाजी काय.
नागपूर सज्ज, हिवाळी अधिवेशनादरम्यान तब्बल ११ हजार पोलिसांचा फौजफाटा
नागपूर सज्ज, हिवाळी अधिवेशनादरम्यान तब्बल ११ हजार पोलिसांचा फौजफाटा.
नवी मुंबईतील 'या' भागातून अल्पवयीन मुलं अचानक बेपत्ता, नेमकं घडतंय काय
नवी मुंबईतील 'या' भागातून अल्पवयीन मुलं अचानक बेपत्ता, नेमकं घडतंय काय.
...तर हे बाबासाहेबांना अभिवादन राहिलं असतं, सुजात आंबेडकरांची खंत काय?
...तर हे बाबासाहेबांना अभिवादन राहिलं असतं, सुजात आंबेडकरांची खंत काय?.
महामानवाला नमन करत मुख्यमंत्री म्हणाले, बाबासाहेबांच्या तत्वावरच...
महामानवाला नमन करत मुख्यमंत्री म्हणाले, बाबासाहेबांच्या तत्वावरच....
उद्धव ठाकरेंकडून बाबासाहेबांना अभिवादन, ठाकरे गटाचे इतर नेतेही हजर
उद्धव ठाकरेंकडून बाबासाहेबांना अभिवादन, ठाकरे गटाचे इतर नेतेही हजर.
चैत्यभूमीवर दाखल होताच 'या' कारणामुळे अजित पवार संतापले, नेमक काय घडलं
चैत्यभूमीवर दाखल होताच 'या' कारणामुळे अजित पवार संतापले, नेमक काय घडलं.
बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त चैत्यभूमीवर अनुयायांचा जनसागर
बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त चैत्यभूमीवर अनुयायांचा जनसागर.
... तर आम्ही ४८ जागा लढवू, प्रकाश आंबेडकर यांचं मोठं वक्तव्य
... तर आम्ही ४८ जागा लढवू, प्रकाश आंबेडकर यांचं मोठं वक्तव्य.