Devendra Fadnavis | विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा हा अर्थसंकल्प; देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
देशाचा अर्थसंकल्प 2026–27 सादर झाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. 'विकसित भारताकडे एक दमदार पाऊल टाकणारा हा अर्थसंकल्प आहे'. या अर्थसंकल्पामुळे देशाच्या सर्व क्षेत्रात सुधारणा होतील, विशेषतः मध्यमवर्ग, शेतकरी, युवक आणि उद्योग क्षेत्रासाठी महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
देशाचा अर्थसंकल्प 2026–27 सादर झाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘विकसित भारताकडे एक दमदार पाऊल टाकणारा हा अर्थसंकल्प आहे’. या अर्थसंकल्पामुळे देशाच्या सर्व क्षेत्रात सुधारणा होतील, विशेषतः मध्यमवर्ग, शेतकरी, युवक आणि उद्योग क्षेत्रासाठी महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. चालू आर्थिक धोरणे आणि गुंतवणूक वाढविण्याच्या उपाययोजनांमुळे देशाची आर्थिक प्रगती जलद होईल आणि रोजगारसंधी वाढतील. हा अर्थसंकल्प 21 व्या शतकातील एक महत्वाचा आणि सर्वसमावेशक अर्थसंकल्प आहे. ज्यामुळे ग्रामीण भागातील बदल, नागरिककेंद्रीत गुंतवणूक आणि दीर्घकालीन विकासाला चालना मिळेल. यामुळे देशातील सामान्य नागरिकाचा आर्थिक भार कमी होईल आणि आर्थिक स्थैर्य मजबूत बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. फडणवीस यांनी असेही सांगितले की, यामुळे महाराष्ट्रासहित विविध राज्यांना देखील बळकट आर्थिक महत्त्व मिळेल आणि केंद्र व राज्य यांच्यातील समन्वयामुळे विकासाच्या संधी वाढतील. सर्वसामान्य नागरिक आणि व्यवसायिकांसाठी हा अर्थसंकल्प फायदेशीर ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एकूणच, केंद्रीय अर्थसंकल्प 2026–27 हा विकसित भारताच्या दिशेने मोठे पाऊल असून यामुळे देशाच्या आर्थिक विकासाची गती वाढेल, असंही फडणवीस म्हणाले.
शशिकांत शिंदेंचा विलीनीकरणावर मोठा दावा; तटकरेंची तीव्र प्रतिक्रिया
विलिनीकरणाला 35 आमदारांचा पाठिंबा? काय म्हणाले सुनील तटकरे?
शिवभोजन थाळी चालकांची चंद्रशेखर बावनकुळेंसमोर जोरदार घोषणाबाजी!
Sunil Tatkare : शशिकांत शिंदेंच्या लेखावर सुनील तटकरेंकडून आक्षेप!

