“देवेंद्रजींचं मुख्यमंत्रीपद उद्धव ठाकरे यांनी चोरलं होतं”, भाजप नेत्याचं टीकास्त्र
2019 च्या विधानसभा निवडणुकांनंतर राज्यात मोठ्या घडामोडी घडला. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबतची 25 वर्षांची युती तोडत काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडीची स्थापना केली. या महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बनल्यानंतर आपला विश्वासघात केल्याचा आरोप भाजप करू लागला. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रेशखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
यवतमाळ: 2019 च्या विधानसभा निवडणुकांनंतर राज्यात मोठ्या घडामोडी घडला. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबतची 25 वर्षांची युती तोडत काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडीची स्थापना केली. या महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बनल्यानंतर आपला विश्वासघात केल्याचा आरोप भाजप करू लागला. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रेशखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “राज्यात आता शिंदे-फडणवीस यांचं सरकारल आलं आहे. 2019 मध्ये महाराष्ट्रातील जनतेने देवेंद्र फडणवीस यांना बहुमत दिलं होतं, पण उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पद चोरलं होतं.पुन्हा भाजपचं सरकार आलं आहे. पुन्हा विदर्भाचा विकास होईल,” असं बावनकुळे म्हणाले.
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
