Eknath Shinde : राज्यपालांनी बोलताना भान राखावं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सल्ला
मराठी माणसांच्या मेहनतीमुळं मुंबई देशाची आर्थिक राजधानी बनली आहे. राज्यपालांनी कुणाचाही अवमान होणार नाही, याची काळजी घ्यावी. असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय.
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या (Bhagat Singh Koshyari) वक्तव्यावर आपण सहमत नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिलीय. मराठी माणसामुळं मुंबईमध्ये (Mumbai) वैभव निर्माण झालं. मराठी माणसांच्या मेहनतीमुळं मुंबई देशाची आर्थिक राजधानी बनली आहे. राज्यपालांनी कुणाचाही अवमान होणार नाही, याची काळजी घ्यावी. असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. राज्यपालांचं विधान हे वैयक्तिक आहे. त्याच्याशी आम्ही सहमत नाही. मुंबईच्या विकासात मराठी माणसाचं योगदान हे कोणी नाकारू शकत नाहीत. राज्यपाल हे मोठं व्यक्तिमत्त्व आहे. त्यामुळं कुणाचाही अवमान होणार नाही, याची काळजी त्यांनी घेतलीच पाहिजे, असंही ते म्हणाले. मराठी माणसामुळं खऱ्या अर्थानं मुंबईला वैभव प्राप्त झाल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

