CM Fadnavis : लातूरमध्ये देवेंद्र फडणवीसांचे डॅमेज कंट्रोल, विलासराव देशमुखांच्या योगदानाला सलाम अन् राजकीय वादावर पडदा!
लातूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विलासराव देशमुखांच्या योगदानाला सलाम करत डॅमेज कंट्रोल केले. रवींद्र चव्हाण यांच्या विधानाबद्दल दिलगिरी व्यक्त करत, फडणवीसांनी देशमुख हे महाराष्ट्राचे महत्त्वाचे नेतृत्व असल्याचे सांगितले. चव्हाण यांच्या वक्तव्याविरोधात लातूर आणि बाभूळगावमध्ये स्थानिकांनी आंदोलन केले होते.
लातूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण डॅमेज कंट्रोल केले. महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये विलासराव देशमुखांचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादंगाच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांनी हे विधान केले. फडणवीस म्हणाले की, विलासराव देशमुखांबद्दल बोलताना रवींद्र चव्हाण यांचे शब्द कदाचित चुकीच्या पद्धतीने गेले असतील, त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
फडणवीसांनी जाहीरपणे सांगितले की, काँग्रेस पक्षाशी राजकीय लढाई असली तरी विलासराव देशमुखांबद्दल त्यांना नितांत आदर आहे. ते महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे नेतृत्व होते आणि आहेत. रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्याविरोधात लातूरमध्ये देशमुख समर्थक आणि व्यापाऱ्यांनी बंद पाळला होता. तसेच, विलासराव देशमुखांचे मूळ गाव असलेल्या बाभूळगावमध्ये देखील स्थानिकांनी चव्हाण यांच्याविरोधात आंदोलन केले होते. या पार्श्वभूमीवर, फडणवीसांनी विलासराव देशमुखांच्या योगदानाला आदराने स्मरण करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.
समृद्धी महामार्गाची संपल्पना मी मांडली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
म्हातारा झाल्यावर गरज संपते, मुलीला तिकीट नाकारताच दगडू सकपाळ संतापले
काँग्रेसचा हात सोडून 12 नगरसेवकांनी हाती कमळ अन् हर्षवर्धन सपकाळ बरसले
महापाप केल्यावर मुख्यमंत्री अन् महापौर पद! फडणवीस आणि....

