Santosh Bangar : कावड यात्रेत मुख्यमंत्री करणार 3 किमी पायी प्रवास…! संतोष बांगर यांची माहिती
शिवसेनेतून बंड केल्यानंतर आ. बांगर हे चांगलेच चर्चेत आले होते. आता जिल्ह्यातील कावड यात्रेला मुख्यमंत्री उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे तर दुसरीकडे न्यायालयीन लढा एकनाथ शिंदे हेच जिंकणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. त्यामुळे कोर्टात निर्णयाचे आणि यात्रेत मुख्यमंत्र्याचे पायी चालणे याबाबत काय होणार हे पहावे लागणार आहे.
हिंगोली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राज्यात सुरु असलेल्या दौऱ्याला त्यांच्या आजारामुळे ब्रेक लागला आहे. मात्र, पुन्हा ते आपल्या दौऱ्याला सुरवात करतील असे आमदारांकडून सांगण्यात येत आहे. हिंगोली जिल्ह्यातील आमदार संतोष बांगर यांनी तर एकनाथ शिंदे हे कावड यात्रेला तर उपस्थित राहणारच आहेत पण यासाछी ते दोन ते तीन किमीचा पायी प्रवासही करणार असल्याचे सांगितले आहे. शिवसेनेतून बंड केल्यानंतर आ. बांगर हे चांगलेच चर्चेत आले होते. आता जिल्ह्यातील कावड यात्रेला मुख्यमंत्री उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे तर दुसरीकडे न्यायालयीन लढा एकनाथ शिंदे हेच जिंकणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. त्यामुळे कोर्टात निर्णयाचे आणि यात्रेत मुख्यमंत्र्याचे पायी चालणे याबाबत काय होणार हे पहावे लागणार आहे.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

