Nana Patole On BJP : सरकारचे नेते शेतकऱ्यांना भिकारी समजतात; निलंबनानंतर नाना पटोले संतापले
Maharashtra Mansoon Assembly Session LIVE : पावसाळी अधिवेशनात आज नाना पटोले यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
आज शेतकऱ्यांचा दिवस आहे. माज आलेले जे भाजप महायुतीचे सरकार आहे. या सरकारची वास्तविकता आज समोर आली आहे, अशी आक्रमक प्रतिक्रिया कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी दिली आहे. पावसाळी अधिवेशनात आज काँग्रेस नेते नाना पटोले यांचे सभापतींनी निलंबन केले. त्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला.
लोणीकरांनी शेतकऱ्यांचा अपमान केला, त्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी, अशी मागणी पटोले यांनी केली होती. सभात्याग केल्यानंतर नाना पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, सरकारचे नेते शेतकऱ्यांना भिकारी समजतात. कपडे हे घेऊन देतात. 2014 च्या आधी लोणीकर उघडाच फिरत होता. जो शेतकऱ्यांच्याबाबतीत बोलेल त्याला निलंबित करणे आणि जे अपमान करतात त्यांना सन्मानाने बसवायचे, यश टीका नाना पटोले यांनी केली आहे.
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?

