AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन

मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन

| Updated on: Sep 14, 2026 | 6:32 PM
Share

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दादा भुसे यांनी मनोज जरांगे पाटलांना विनंती केली आहे की, सरकारने बहुतांश मागण्या मान्य केल्या असून राहिलेले मुद्देही निश्चितपणे सकारात्मक भूमिकेने सोडवले जातील. मराठा समाजाच्या आर्थिक स्थितीची जाणीव असून, कष्टकऱ्यांना न्याय मिळेल याची शासनाला खात्री आहे.

राज्याचे मंत्री दादा भुसे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटलांना आवाहन केले आहे. गणेशोत्सवाच्या पवित्र वातावरणात बोलताना भुसे म्हणाले की, शासनाने जरांगे पाटील यांच्या बऱ्यापैकी मागण्या मान्य केलेल्या आहेत. काही मुद्दे अजूनही प्रलंबित असतील, तर त्यावर शासन सकारात्मक भूमिका घेईल आणि ते निश्चितपणे सोडवले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली. भुसे यांनी मराठा समाजातील अनेक कुटुंबांची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याची आणि कष्टकरी समाज बांधवांना न्याय मिळायला हवा याची जाणीव व्यक्त केली.

याबद्दल शासनाचे कोणतेही दुमत नाही असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, भविष्यात केंद्र सरकारमार्फत समान नागरी कायदा लागू होईल, असे संकेत मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. नुकतेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी २०२९ पर्यंत भाजप आणि एनडीएचे सरकार जिथे जिथे असेल तिथे समान नागरी कायद्याबाबत घोषणा केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनुसार, मुख्य प्रवाहापासून दूर राहिलेल्यांना न्याय मिळणे ही यामागील भावना असल्याचे भुसे यांनी नमूद केले. या कायद्यामुळे पाठीमागे राहिलेल्या सर्व समाजांना न्याय मिळेल, असे ते म्हणाले.

Published on: Sep 14, 2026 06:32 PM

Follow Us