“…तर मी राजीनामा देऊन संन्यास घेईन”, देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
आरक्षणात मी अडथळा आणला असं मुख्यमंत्री एकनथ शिंदे म्हणाले तर त्याच क्षणी मी राजीनामा देईन, असं मोठं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलत असताना मनोज जरांगे पाटील यांना उत्तर देत असताना देवेंद्र फडणवीस यांनी रोखठोक भूमिका मांडली आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मैदानात उतरलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. “एकनाथ शिंदेंना आरक्षण द्यायचे आहे, पण देवेंद्र फडणवीस हे आरक्षण देण्यासाठी थांबवत आहेत”, असा खळबळजनक आरोप जरांगे पाटील यांनी केला. या आरोपावर बोलताना देवेंद्र फडणवीसांनी हे प्रत्युत्तर दिले आहे. पुढे ते असेही म्हणाले, आजपर्यंत मराठा समाजासाठी जे काही निर्णय झाले ते एकतर मी केले. माझ्यानंतर एकनाथ शिंदेंनी केले आणि शिंदेंच्या पाठीशी मी भक्कमपण उभा राहिलो आहे. मी पुन्हा सांगतो जर एकनाथ शिंदेंनी सांगितलं की मराठा आरक्षणासाठी त्यांना निर्णय घ्यायचा आणि त्या निर्णयामध्ये मी अडथळा निर्माण केला आहे, मी तो निर्णय होऊ दिला नाही, त्याचक्षणी मी राजीनामा देईन. तसेच राजकारणातून संन्यासही घेईन, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
नागरिकांनो घाबरू नका, राज्यात गॅसचा तुटवडा नाही, भुजबळ यांनी थेट....
युद्धाचा परिणाम मुंबईतील ड्रायफ्रूट मार्केटवर, सुकामेव्याच्या दरात....
आखाती युद्धाचा फटका शेतकऱ्यांना, हळदीचे दर घसरले, शेतकरी अडचणीत
काँग्रेसने खोट्या रील्सची इंडस्ट्री सुरू केली– मोदींचा हल्लाबोल

