वारकऱ्यांवरील लाठीचार्ज निंदनीय,देहू संस्थानकडून वारकऱ्यांवरील हल्ल्याचा निषेध!
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात वारकरी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली.पालखी सोहळ्यातील वारकरी बांधवांवर पोलिसांनी लाठीमार केला. यावरून देहू संस्थानकडून देखील वारकऱ्यांवरील हल्ल्याचा निषेध केला आहे.
पुणे : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात वारकरी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली.पालखी सोहळ्यातील वारकरी बांधवांवर पोलिसांनी लाठीमार केला. यावरून देहू संस्थानकडून देखील वारकऱ्यांवरील हल्ल्याचा निषेध केला आहे. काल आळंदीत वारकऱ्यांवर झालेली लाठीचार्जची घटना निंदनिय आहे.प्रशासनाने आणि वारकऱ्यांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी,वारकरी हा सहिष्णू असतो त्यांना अशा प्रकारे पोलिसांनी अडवायला नको होतं. महाराष्ट्राच्या संस्कृतीला गालबोट लावण्याचं काम पोलिसांनी केल आहे. वारकरी हे पोलिसांना सहकार्य करतीलच, प्रशासनानं आत्मचिंतन कराव, या घटनेचा खोलवर तपास करावा, असं देहू विश्वस्तांनी म्हटलं आहे.
Published on: Jun 12, 2023 12:33 PM
Follow Us
Latest Videos
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
