वारकऱ्यांवरील लाठीचार्ज निंदनीय,देहू संस्थानकडून वारकऱ्यांवरील हल्ल्याचा निषेध!
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात वारकरी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली.पालखी सोहळ्यातील वारकरी बांधवांवर पोलिसांनी लाठीमार केला. यावरून देहू संस्थानकडून देखील वारकऱ्यांवरील हल्ल्याचा निषेध केला आहे.
पुणे : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात वारकरी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली.पालखी सोहळ्यातील वारकरी बांधवांवर पोलिसांनी लाठीमार केला. यावरून देहू संस्थानकडून देखील वारकऱ्यांवरील हल्ल्याचा निषेध केला आहे. काल आळंदीत वारकऱ्यांवर झालेली लाठीचार्जची घटना निंदनिय आहे.प्रशासनाने आणि वारकऱ्यांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी,वारकरी हा सहिष्णू असतो त्यांना अशा प्रकारे पोलिसांनी अडवायला नको होतं. महाराष्ट्राच्या संस्कृतीला गालबोट लावण्याचं काम पोलिसांनी केल आहे. वारकरी हे पोलिसांना सहकार्य करतीलच, प्रशासनानं आत्मचिंतन कराव, या घटनेचा खोलवर तपास करावा, असं देहू विश्वस्तांनी म्हटलं आहे.
Published on: Jun 12, 2023 12:33 PM
Follow Us
Latest Videos
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
