AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis | 'मुंबईच्या समस्येचा आरोपी कोण? मुंबईकर न्याय करतील तेव्हा सत्तापालट झालेला असेल'

Devendra Fadnavis | ‘मुंबईच्या समस्येचा आरोपी कोण? मुंबईकर न्याय करतील तेव्हा सत्तापालट झालेला असेल’

| Updated on: Aug 20, 2022 | 5:53 PM
Share

मुंबईचा खटला हा मुंबईच्या जनतेच्याच न्यायालयात ठेवायचा आहे. मुंबईकरांना सांगायचं आहे की, न्यायाधीश तुम्ही, आरोपी हे आणि आता मुंबईकरता न्याय करा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी षण्मुखानंद सभागृहात भाजपची सभा घेण्यात आली. यावेळी फडणवीस म्हणाले, मराठी माणसाची लढाई लढणारे जर कोणी असेल तर या ठिकाणी या मंचावर बसलेले आशिष शेलार यांच्या नेतृत्वातले आम्ही सगळे आहोत. आम्हाला मराठीचा अभिमान आहे आणि तो असलाच पाहिजे. भाजप हा क्षेत्रीय रक्षण करणारे आहे. आता महापालिकेच्या निवडणूका जवळ आहेत. मुंबईचीही होणार आहे. त्यामुळे आपल्याला सगळ्यांना आता समोर जावं लागेल. मुंबईचा खटला हा मुंबईच्या जनतेच्याच न्यायालयात ठेवायचा आहे. मुंबईकरांना सांगायचं आहे की, न्यायाधीश तुम्ही, आरोपी हे आणि आता मुंबईकरता न्याय करा. तर आफल्याला विश्वास आहे की, त्यावेळी जनता न्याय करेल आणि जनतेच्या मनातलं जे काही आहे ते या ठिकाणी निश्चितपणे समोर येईल.

 

Published on: Aug 20, 2022 05:53 PM