Eknath Shinde : एकाने मराठीची तळमळ अन् दुसऱ्याने खुर्चीची मळमळ बोलून दाखवली – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Eknath Shinde Slams Thackeray Brothers : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यावर जोरदार टीका केली.
एका वक्त्याने मराठीबद्दलची तळमळ व्यक्त केली, तर दुसऱ्याने सत्तेची आणि खुर्चीची मळमळ बोलून दाखवली. काही लोकांचे म्हणणे होते की, या मेळाव्याला “झेंडा नाही, अजेंडा नाही.” मात्र, एका वक्त्याने मराठीचे पथ्य पाळले, तर दुसऱ्याने स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडा निवडणुकीच्या भाषणाप्रमाणे मांडला, असा टोला शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यावर जोरदार टीका केली. राज ठाकरे यांच्या भाषणात मराठी भाषेबद्दलची तळमळ दिसून आली, परंतु उद्धव ठाकरे यांच्या भाषणात केवळ सत्ता आणि स्वार्थाची हाव दिसली, असे शिंदे यांनी म्हटले. या मेळाव्याने मराठी माणसाच्या अपेक्षा पूर्ण न झाल्याचे त्यांनी नमूद केले.
उद्धव ठाकरे यांनी मेळाव्यात ‘पुष्पा’ चित्रपटातील “उठेगा नहीं साला” या डायलॉगद्वारे शिंदेंवर टीका केली. याला प्रत्युत्तर देताना शिंदे म्हणाले, “हा डायलॉग उद्धव ठाकरेंनाच शोभतो.” त्यांनी पुढे उपरोधिकपणे म्हटले की, तीन वर्षांपूर्वी “दाढीवरून अर्धाच हात फिरवल्याने” उद्धव ठाकरे आडवे झाले आणि अजूनही सावरले नाहीत. आता कुणाचा तरी हात पकडून उठण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. “पूर्ण दाढीवरून हात फिरवला असता तर काय झाले असते, याचा विचार त्यांनी करावा,” असे शिंदे म्हणाले. फक्त बोलण्याने काही होत नाही, त्यासाठी मनगटात ताकद हवी, असेही ते म्हणाले.
Published on: Jul 05, 2025 06:49 PM
3 वर्षांत 22 लाखांहून अधिक कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप; या जिल्ह्यांत...
खड्डे, बंद कंपन्या आणि बेरोजगारी! वाजेंनी सरकारला एकाच वेळी घेरलं
शिवसेनेच्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये... नरेश म्हस्के काय म्हणाले?
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन.... शिंदे गटातील नेत्याचं विधान
