Jayant Patil : .. तर उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री, जयंत पाटलांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणालेत जाणून घ्या…
सुप्रीम कोर्टाने 27 जुलैपर्यंत कागदपत्र सादर करायला तसेच 1 ऑगस्टला या प्रकरणी पुढील सुनावणी ठेवली आहे. ही सुनावणी अत्यंत महत्त्वाची सुनावणी ठरणार. दरम्यान, जयंत पाटील यांनी मोठं विधान केलंय.
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात, असं सूचक विधान केल्याने राजकीय चर्चांना उधाण आलंय. तसेच अरुणाचल प्रदेश सरकारसारखा निकाल महाराष्ट्राच्या बाबतीतही लागू शकतो, असंही जयंत पाटील म्हणाले आहेत. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आज सुप्रीम कोर्टात (Supreme Court) मोठी सुनावणी पार पडली आणि अजूनही शिंदे गटातील (Eknath Shinde) आमदारांचं काय होणार? हा प्रश्न अनुत्तरीतच राहिला आहे. मात्र या सुनावणीनंतर आता नेत्यांच्या यावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यावरच जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टाने 27 जुलैपर्यंत कागदपत्र सादर करायला तसेच 1 ऑगस्टला या प्रकरणी पुढील सुनावणी ठेवली आहे. ही सुनावणी अत्यंत महत्त्वाची सुनावणी ठरणार आहे.
Latest Videos
Latest News