AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Girish Mahajan | नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी; गिरीश महाजनांचे मोठे विधान, ही राजकारण करण्याची वेळ नाही...

Girish Mahajan | नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी; गिरीश महाजनांचे मोठे विधान, ही राजकारण करण्याची वेळ नाही…

| Updated on: Jul 06, 2026 | 2:02 PM
Share

राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून, पूरस्थिती गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आपत्कालीन यंत्रणा सतर्क केल्या असून, सर्व संबंधित विभाग अलर्ट मोडवर असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून, पूरस्थिती गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आपत्कालीन यंत्रणा सतर्क केल्या असून, सर्व संबंधित विभाग अलर्ट मोडवर असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

गिरीश महाजन म्हणाले की, राज्यातील संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी एसडीआरएफ (SDRF), एनडीआरएफ (NDRF), जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन तसेच इतर सर्व यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहेत. कोणत्याही ठिकाणी आपत्कालीन घटना घडल्यास तातडीने मदत आणि बचावकार्य सुरू करण्यासाठी शासनाची यंत्रणा रस्त्यावर उतरली असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.

यावेळी त्यांनी नागरिकांना प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करत, आवश्यक ती खबरदारी घेण्याचे सांगितले. तसेच, सध्याची परिस्थिती अत्यंत गंभीर असून मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे अनेक भागांमध्ये धोका निर्माण झाला आहे, असे त्यांनी नमूद केले.

राजकीय आरोप-प्रत्यारोपांवर भाष्य करताना गिरीश महाजन म्हणाले की, “ही टीका किंवा राजकारण करण्याची वेळ नाही. सध्या नागरिकांची सुरक्षितता सर्वांत महत्त्वाची आहे. अशा गंभीर परिस्थितीत सर्वांनी एकत्र येऊन आपत्ती व्यवस्थापनाला सहकार्य करणे गरजेचे आहे.”

दरम्यान, राज्यातील पूरग्रस्त भागांवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष असून, परिस्थितीनुसार आवश्यक त्या सर्व उपाययोजना युद्धपातळीवर राबवल्या जात असल्याची माहितीही त्यांनी दिली.

Published on: Jul 06, 2026 02:02 PM

Follow Us