शेतकऱ्यांचा मागण्या मान्य होणार आहे का? आज सरकारसोबत बैठक
याच्याआधी शहापूर तहसील कार्यालयात राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून मंत्री दादा भुसे मंत्री अतुल सावे यांची शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत बैठक झाली होती.
मुंबई : शेतकरी त्यांच्या विविध मागण्या घेऊन मुंबईकडे कूच करत आहेत आणि त्यावर तोडगा निघावा म्हणून राज्य सरकार प्रयत्न करत आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि किसान सभेचे नेते यांच्यात बैठक होणार आहे. याच्याआधी शहापूर तहसील कार्यालयात राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून मंत्री दादा भुसे मंत्री अतुल सावे यांची शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत बैठक झाली होती. यावेळी शेतकरी शिष्ट मंडळ जवळपास 40 ते 50 टक्के समाधान असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक मागण्यांवर समाधानकारक तोडगा निघावा अशी मागणी शिष्टमंडळाची होती. त्यानुसार आज बैठक होत आहे. त्याचबरोबर जर आज तोडगा नाही निघाल्यास हा मोर्चा मुंबईला धडकणार आहे. तर याबैठकीत आज तोडगा निघणार की नाही यावर राज्याचे लक्ष लागले आहे.
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये...
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त

