रत्नागिरीत मच्छिमारांची कसली धावाधाव? का करतायंत नौकांची आवराआवर?
याचदरम्यान आता मान्सूनचे आगमन लवकरच होणार असल्याचा तर पुढील तीन दिवस मान्सूनपूर्व पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवला आहे. याचदरम्यान शेतकऱ्यांची मशागती लगबग सुरू असतानाच मात्र कोकणात कोळी बांधवांची देखील लगबग सुरू झाली आहे.
रत्नागिरी : मे महिना संपत आला असून राज्यभरातील शेतकऱ्यांसह (Farmers) अबालवृद्धांचं लक्ष यंदाच्या मान्सूनकडे लागलं आहे. यंदा मान्सून कधी दाखल होणार याबाबत वेगवेगळे अंदाज वर्तवण्यात येत आहे. याचदरम्यान आता मान्सूनचे आगमन लवकरच होणार असल्याचा तर पुढील तीन दिवस मान्सूनपूर्व पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवला आहे. याचदरम्यान शेतकऱ्यांची मशागती लगबग सुरू असतानाच मात्र कोकणात कोळी बांधवांची देखील लगबग सुरू झाली आहे. पावसाळी मासेमारी बंदीच्या पाश्वभूमीवर मच्छिमार नौकांची आवराआवर सुरु झालीय. पावसाळी मासेमारीला 1 जून पासून बंदी असणार आहे. नौकांची रंगरंगोटी, जाळी सुरक्षित ठिकाणी ठेवणे नौका समुद्रापासून वर आणून झाकून ठेवणे अशी कामे मच्छिमार करताना दिसतोय.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट

