AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amrullah Saleh : भारताची पाऊलं अफगाणिस्ताननं ओळखली? माजी राष्ट्रपती म्हणाले, असं वाटतंय...शत्रूंचा खात्मा करण्यासाठी...

Amrullah Saleh : भारताची पाऊलं अफगाणिस्ताननं ओळखली? माजी राष्ट्रपती म्हणाले, असं वाटतंय…शत्रूंचा खात्मा करण्यासाठी…

| Updated on: May 05, 2025 | 11:27 AM

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच भारताकडून पाकिस्तानविरोधात कठोर पाऊलं उचलण्यास सुरूवात झाली आहे.

भारताची पावलं अफगाणिस्ताननेही ओळखली की काय अशी चर्चा सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असल्याचे पाहायला मिळतंय. पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती अमरुल्लाह सालेह यांनी मोठे विधान केले आहे. भारताकडून आपल्या शत्रूंना संपवण्याचा प्रयत्न होत असल्याचं वक्तव्य अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती अमरुल्लाह सालेह यांनी केलं आहे. भारताकडून शस्त्रूंना संपवण्यासाठी इलेक्ट्रिक खूर्चीऐवजी लांब दोरीचा वापर केला जातोय असं अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती अमरुल्लाह सालेह यांनी म्हटलंय. त्यांनी एक ट्वीट करत यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘असं वाटतंय… भारताने आपल्या शत्रूंना संपवण्यासाठी इलेक्ट्रिक खूर्ची वापरण्याऐवजी त्यांचा गळ्यात खूप लांब दोरी बांधली आहे.’, असं अमरुल्लाह सालेह यांनी ट्विट केलंय.या ट्विटद्वारे त्यांना असं सांगायचं आहे की, भारत आपल्या शत्रूंना एकाच वेळी नाही तर हळूहळू पण कठोर शिक्षा देत आहे. भारताने दहशतवादाविरुद्ध कठोर कारवाई करण्याची वचनबद्धता व्यक्त केली आहे, तर पाकिस्तान सतर्क स्थितीत आहे. अशावेळी अमरुल्लाह सालेह यांची प्रतिक्रिया समोर येतेय

Published on: May 05, 2025 11:27 AM