आंदोलन होतं विशाळगडासाठी, टार्गेट झालं गजापूर, नेमका कोणी घातला धुडगूस?
विशाळगडावरील १५८ ठिकाणी अतिक्रमण झालं आहे. तर अतिक्रमण हटाओ.. या आंदोलनाअडून जमावाने ज्या धार्मिक स्थळाची तोडफोड केली. ती किल्यापासून ३ किलोमीटर दूर असलेल्या गजापूर या गावात झाली. या गावाचा अतिक्रमणाशी कोणताही संबंध नव्हता. तरीही ते गाव टार्गेटवर?
विशाळगडाच्या वादात अतिक्रमणाशी संबंध नसताना एक गाव जमावानं टार्गेट केलं. त्या हल्ल्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा आरोप केलाय. कारण वेगवेगळे व्हिडीओ आणि अर्धवट माहितीने सोशल मीडियावर संभ्रम पसरवला जात आहे. विशाळगडावरील १५८ ठिकाणी अतिक्रमण झालं आहे. तर अतिक्रमण हटाओ.. या आंदोलनाअडून जमावाने ज्या धार्मिक स्थळाची तोडफोड केली. ती किल्यापासून ३ किलोमीटर दूर असलेल्या गजापूर या गावात झाली. या गावाचा अतिक्रमणाशी कोणताही संबंध नव्हता. दुसरा मुद्दा म्हणजे किल्ल्यावर झालेलं अतिक्रमण हटवण्याला ना सत्ताधाऱ्यांचा विरोध आहे ना विरोधकांचा… मात्र कोणताही संबंध नसलेल्या गजापूर या गावात लोकांची घरं, धार्मिक स्थळ आणि वाहनांची तोडफोड का केली? यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट
महागाईचा फटका! एलपीजी गॅसची किंमत वाढली, किंमत 3000 च्या पुढे...
डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूमागचे सत्य समोर, नेमकं काय घडलं?
8 वर्षांची प्रतीक्षा संपली, आजपासून मिसिंग लिंक सर्वसामान्यांसाठी खुला
मुस्लिम लग्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज-टिपू सुलतानचा उल्लेख?

