Kolhapur | कोल्हापूर मार्केटमधील गुळाला गुजरातच्या व्यापाऱ्यांकडून नकार, कारण थक्क करणारं
कोल्हापूर आणि सांगली येथून येणाऱ्या गुळावर गुजरातमधील व्यापाऱ्यांनी बंदी घातली आहे. मात्र यामागील नेमकं कारण काय?
कोल्हापूर आणि सांगली येथून येणाऱ्या गुळावर गुजरातमधील व्यापाऱ्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. ठराविक तारखेनंतर कोल्हापूर आणि संगली या भागातील गुळ खरेदी करायचा नाही, अशी स्पष्ट भूमिका गुजरात मधील व्यापाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांमध्ये आणि उत्पादकांमध्ये चिंता वाढली आहे. सध्या कोल्हापूर तसेच सांगलीत मुदत संपण्यापूर्वी जास्तीत जास्त गुळ विक्रीसाठी पाठवण्याची घाई सुरू आहे.
या निर्णयामागे महत्त्वाचं कारण म्हणजे अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या तपासणीत काही गुळामध्ये घातक रसायनांचे अंश आढळल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी जबाबदारी टाळण्यासाठी सावध पवित्रा घेतला आहे. मात्र हे रसायन नेमकं कुठून आले, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. आधीच गुळाला अपेक्षित दर मिळत नसताना या नव्या संकटामुळे शेतकरी आणि उत्पादक मोठ्या अडचणीत सापडले आहेत.
आयटी कंपनीनंतर आता मुंबईच्या नामांकित बँकेत धर्मपरिवर्तन? पतीचा...
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खूश खबर... अखेर कांदा प्रश्नावर तोडगा निघणार
कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क... कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाह..
पंतप्रधान मोदींवर सपकाळांची जहरी टीका; पनोती वक्तव्याने महाराष्ट्रात..

