Harshwardhan Sapkal | सरकार मुकं, बहिरं आणि आंधळं आहे कारण…., ‘या’ मुद्यावरुन सपकाळांनी सरकारला खूपच सुनावलं
बारामतीतील निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. अजित पवारांच्या अपघाताच्या FIR बाबतही त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली.
बारामतीतील निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. अजित पवारांच्या अपघाताच्या FIR बाबतही त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. अलीकडील त्यांच्या या वक्तव्याने खळबळ उडवली आहे.
सत्ताधारी पक्षाविषयी बोलताना त्यांनी ‘सरकार अजित पवरांच्या अपघाताची एफआयआर घेईल तर आम्ही निवडणुकीतून माघार घेण्याचा विचार करु, असं सांगितलं.’ पुढे ते म्हणाले, ‘या अपघाताचा गुन्हा त्यांनी इतरांच्या मागणीआधीच नोंदवून घ्यायला हावा होता. आमच्या अटीनंतरही सरकारची याविषयात काही हालचाल दिसत नाही त्यामुळे सरकार खरंच मुकं, बहिरं आणि आंधळंही आहे.’
पुढे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले ‘आपण शांतपणे निवडणूका लढू शकतो मात्र, अलीकडच्या काळात निवडणुका म्हणजे लढाई असं हिंसक वळण आलंय.’
सरकार मुकं, बहिरं अन् आंधळंही कारण...., 'या' मुद्यावरुन हर्षवर्धन सपका
भाजपला बिनविरोध शब्दाचा एवढा पुळका?.... सपकाळांचा भाजपवर हल्लाबोल
भोंदू खरातच्या तसल्या व्हिडीओची ऑनलाईन विक्री, महिलांचे आक्षेपाहार्य..
बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसचा निर्णय निर्णायक ठरणार?

