Monsoon BIG Update : मान्सून अरबी समुद्रात दाखल, 27 मेपर्यंत केरळात पण महाराष्ट्रात कधी बसरणार?
मान्सून अरबी समुद्रात दाखल झाला असल्याची मोठी बातमी समोर आली आहे. अंदमानही व्यापला असल्याचे सांगितले जात आहे. अशातच 27 मेपर्यंत केरळात मान्सून धडकणार असून महाराष्ट्रात कधी पडणार? याची उत्सुकता लागून आहे.
मान्सूस संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. मान्सून अरबी समुद्रात दाखल झाला आहे. अरबी समुद्रासोबतच मालदीव, बंगालचा उपसागर आणि अंदमानच्या काही भागात मान्सून पुढे सरकला असून येत्या २७ मेपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तर महाराष्ट्रात ७ जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे देशभरातील शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मान्सून आज अरबी समुद्र, मालदीव, बंगालचा उपसागर आणि अंदमानच्या काही भागात पुढे सरकला आहे. के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात पुढील ४ ते ५ दिवसांत मध्यम ते तीव्र गडगडाटासह जोरदार वारे आणि काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मेघगर्जनेदरम्यान बाहेर पडणे टाळा. झाडांना आश्रय म्हणून घेऊ नका. सुरक्षिततेच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करा, असे आवाहनही नागरिकांना करण्यात येत आहे.
Published on: May 15, 2025 04:12 PM
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
