आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर हल्ला झाला, केला गेला की करवला गेला, विरोधी पक्षाचा आरोप काय ?
भाजप आमदार प्रसाद लाड यांनी प्रतिक्रिया देताना असा हल्ला होणे निश्चित अयोग्य आहे. महाराष्ट्र पोलीस याची दाखल घेऊन योग्य ती कारवाई करतीलच. पण हा हल्ला..
मुंबई : युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर काल रात्री अज्ञात इसमांकडून हल्ला झाला. शिवसंवाद यात्रेसाठी औरंगाबाद येथे आदित्य ठाकरे आले होते. ही सभा संपल्यानंतर त्यांच्या गाडीच्या दिशेने एक दगड आला. त्यानंतर आणखी काही दगड आले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येत आहे. त्यामुळे काही समाजकंटक मुद्दाम असे प्रकार घडवीत आहेत. या समाजकंटकांकडून रमेश बोरनारे यांच्या नावाच्या घोषणा सुरु होत्या. दरम्यान, भाजप आमदार प्रसाद लाड यांनी प्रतिक्रिया देताना असा हल्ला होणे निश्चित अयोग्य आहे. महाराष्ट्र पोलीस याची दाखल घेऊन योग्य ती कारवाई करतीलच. पण हा हल्ला झाला, केला गेला की करवला गेला याची चौकशी व्हावी. आदित्य यांना सुरक्षा पुरविली जावी असेही ते म्हणाले.
आजच्या महाराष्ट्र बातम्या: शिवसेना सुनावणी, राजकीय घडामोडी
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
