AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीम इंडिया चौथ्यांद टी-20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये!

टीम इंडिया चौथ्यांद टी-20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये!

| Updated on: Mar 06, 2026 | 9:44 AM
Share

टी-20 विश्वचषक उपांत्य फेरीत भारताने इंग्लंडचा सात धावांनी पराभव करत चौथ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली आहे. संजू सॅमसनच्या ८९ धावांच्या खेळीच्या बळावर भारताने २५३ धावा केल्या होत्या. इंग्लंडच्या जेकबने शतकी खेळी केली तरी तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. मुंबईतील मरीन ड्राईव्हवर भारतीय चाहत्यांनी जल्लोष केला.

टी-20 विश्वचषक उपांत्य फेरीत भारताने इंग्लंडचा सात धावांनी पराभव करत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या रोमांचक सामन्यात भारतीय संघाने विजयाचा झेंडा रोवला. संजू सॅमसनच्या ८९ धावांच्या अप्रतिम खेळीमुळे भारताने इंग्लंडसमोर २५३ धावांचे आव्हान ठेवले होते.

या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या फलंदाजांनी कडवी झुंज दिली. जेकबने शानदार शतकी खेळी केली, मात्र त्याचे प्रयत्न अपुरे ठरले. जसप्रीत बुमराहच्या अचूक गोलंदाजीमुळे इंग्लंडला निर्धारित धावांपर्यंत पोहोचता आले नाही. भारताने सात धावांनी हा सामना जिंकला. या विजयानंतर मुंबईतील मरीन ड्राईव्हसह देशभरात क्रिकेट चाहत्यांनी मोठा जल्लोष केला. भारताची अंतिम लढत अहमदाबादमध्ये नेदरलँड्स संघासोबत होणार आहे.

Published on: Mar 06, 2026 09:44 AM
Follow Us