Pahalgam Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्य दल अॅक्शनमोडमध्ये, पाच दहशतवाद्यांची सात घरं जमीनदोस्त
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्य दलाकडूनही पाऊलं उचलली जात आहे. स्थानिक दहशतवाद्यांना कायमचा धडा देण्याकरता शोपिया-पुलवामा-कुलगाममध्ये मोठी कारवाई करण्यात येत आहे.
जम्मू काश्मीर येथील पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतावादी हल्ल्यानंतर भारतकडून कठोर पाऊलं उचलली जात आहे. अशातच आता भारतीय सैन्य दल ॲक्शन मोडमध्ये आल्याचे पाहायला मिळत आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा कसून शोध घेऊन त्यांना ठार करण्यात येत आहे. याकरता भारतीय सैन्याकडून व्यापक शोध मोहीम राबवण्यात येत आहे. दरम्यान, पहलगाम हल्ल्यातील संशयित दहशतवाद्यांना भारतीय सैन्य दलाकडून चांगलाच दणका देण्यात आलाय. कालपासून एकूण पाच दहशतवाद्यांची सात घरं जमीनदोस्त केल्याचे पाहायला मिळाले. पुलवामा, कुलगाम, त्राल, बिजबेहरा आणि शोपियाम भागात भारतीय सैन्य दलाकडून ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. काल दोन तर आज तीन दहशतवाद्यांच्या घरावर कारवाई करत पहलगाम हल्ल्यातील संशयित दहशतवाद्यांची घरं जमीनदोस्त केली आहेत.
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर

