AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोदार स्कूल बस प्रकरणाची कसून चौकशी झाली पाहिजे : Kishori Pednekar

| Edited By: | Updated on: Apr 04, 2022 | 10:12 PM
Share

शाळा आणि बसचालक यांचा ताळमेळ असलाच पाहिजे. त्यांचे ड्रायव्हर, क्लीनर कोण आहे यांची माहिती शाळेकडे असावी. शाळेपासून 10-15 किमीवर विद्यार्थी राहतात त्यांना इतका उशीर का झाला याची कसून चौकशी झाली पाहिजे, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.

मुंबई : मुंबईच्या सांताक्रूझमधील पोदार स्कूलमधील (Podar School in Santacruz) काही विद्यार्थी शाळा सुटल्यानंतर स्कूल बसनं (School Bus) निघाले. मात्र बराच वेळ घरी परतले नव्हते. स्कूल बसने हे विद्यार्थी (School Students) शाळा सुटल्यानंतर घरी परतं अपेक्षित होतं. मात्र तसं न झाल्यानं पालकांना चिंता वाटू लागली. त्यानंतर 12.30 वाजल्यापासून शाळेची स्कूलबस नॉट रिचेबल असल्यानं काळजी आणखीनंच वाढली होती. अस्वस्थ झालेल्या पालकांनी अखेर शाळा गाठली आणि जाब विचारला. संतापलेल्या पालकांना समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं पालकांच्याही संतापाचा पारा आणखीनंच वाढत गेला. अखेर ही मुलं आता घरी परतली असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान महापौर किशोरी पेडणेकर यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. मला ही बाब फार गंभीर वाटते. शाळा आणि बसचालक यांचा ताळमेळ असलाच पाहिजे. त्यांचे ड्रायव्हर, क्लीनर कोण आहे यांची माहिती शाळेकडे असावी. शाळेपासून 10-15 किमीवर विद्यार्थी राहतात त्यांना इतका उशीर का झाला याची कसून चौकशी झाली पाहिजे, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.