AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Saamana : सत्ताधाऱ्यांची मनमानी अन् यंत्रणांचा उन्माद... बिनविरोध फार्स मग निवडणुका का? 'सामना'तून टीकास्त्र

Saamana : सत्ताधाऱ्यांची मनमानी अन् यंत्रणांचा उन्माद… बिनविरोध फार्स मग निवडणुका का? ‘सामना’तून टीकास्त्र

| Updated on: Jan 05, 2026 | 1:49 PM
Share

सामनाच्या अग्रलेखातून सत्ताधाऱ्यांच्या मनमानीवर निशाणा साधण्यात आला आहे. महाराष्ट्रात यंत्रणांचा उन्माद टोकाला पोहोचल्याचे यात म्हटले आहे. निवडणूक लढण्यापूर्वीच विजय विकत घेण्याचा प्रकार सुरू असून, ७० जागांवर बिनविरोध विजय मिळवल्याचा दावा केला आहे. भाजप आणि मित्रपक्षांनी लोकशाहीचे माफियाकरण केल्याचा आरोप अग्रलेखात करण्यात आला आहे.

सामनाच्या अग्रलेखातून महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. बिनविरोध फार्स मग निवडणुका घेता कशाला? असा थेट सवाल या अग्रलेखातून उपस्थित करण्यात आला आहे. सामनाने म्हटले आहे की, राज्यात सत्ताधाऱ्यांची मनमानी सुरू असून, यंत्रणांचा उन्माद टोकाला पोहोचला आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात अशी परिस्थिती कधीच नव्हती, असेही यात अधोरेखित करण्यात आले आहे. निवडणुका लढण्यापूर्वीच जर विजय विकत घेतला जात असेल, तर निवडणूक आयोग बरखास्त करून निवडणुका घेऊच नयेत, अशी भूमिका सामनाने घेतली आहे.

अग्रलेखात नमूद केल्यानुसार, ७० जागांवर एकही मत पडले नसतानाही सत्ताधाऱ्यांनी निवडणुका जिंकल्या. भाजपने आणि त्यांच्या मित्रपक्षांनी लोकशाहीचे हे माफियाकरण केले आहे. जिथे मते चोरणे शक्य झाले नाही, तिथे दहशत आणि पैशांचा वापर करून विरोधी उमेदवारांना माघार घेण्यास भाग पाडल्याचा गंभीर आरोप सामनाच्या अग्रलेखात करण्यात आला आहे. ही परिस्थिती महाराष्ट्राच्या लोकशाहीसाठी चिंताजनक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.

Published on: Jan 05, 2026 01:49 PM