AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बेनीतुरा नदीला पूर! नदीकाठच्या शिवारात साचलं गुडघाभर पाणी; शेतीचं नुकसान

| Updated on: Sep 21, 2025 | 5:56 PM
Share

धाराशिवच्या उमरगा तालुक्यात मुसळधार पावसामुळे बेनीतुरा नदीला पूर आला आहे. या पुरामुळे नदीकाठच्या शिवारात मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकरी सरकारकडून तात्काळ मदत आणि ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करत आहेत.

धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे बेनीतुरा नदीला महापूर आला असून, नदीकाठच्या शेतजमिनींना पाण्याचा फटका बसला आहे. सोयाबीनची पिके गुडघ्याभर पाण्याखाली गेली आहेत आणि मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना सणासुदीच्या तोंडावर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. पिकाचे नुकसान झाल्यामुळे सोयाबीन बाजारात नेणे आणि त्याचे पैसे मिळवणे शेतकऱ्यांना कठीण जात आहे. शेतकरी सरकारकडून तात्काळ मदत आणि ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करत आहेत. पंचनामे झाले असले तरी, मदतीची प्रक्रिया सुरू होण्यास अजून वेळ लागेल असे दिसते.

Published on: Sep 21, 2025 05:56 PM