AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Flood : पूरग्रस्तांच्या मदतीला देवस्थानं सरसावली, कोट्यवधींची मदत, संत-महंत अन् मठांचं योगदान कधी मिळणार?

Maharashtra Flood : पूरग्रस्तांच्या मदतीला देवस्थानं सरसावली, कोट्यवधींची मदत, संत-महंत अन् मठांचं योगदान कधी मिळणार?

| Updated on: Sep 29, 2025 | 11:45 AM
Share

महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेक देवस्थानं, सामान्य नागरिक आणि व्यावसायिक पुढे सरसावले आहेत. दौलत नाही तर दानत लागते, हे मराठवाड्यातील एकोप्यातून सिद्ध झाले. साईबाबा, गजानन महाराज, तुळजापूर मंदिर संस्थानांसह विविध ट्रस्टनी मुख्यमंत्री सहायता निधीत कोट्यवधींची मदत केली आहे.

महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक देवस्थानं, सामान्य नागरिक आणि छोटे व्यावसायिक पुढे सरसावले आहेत. सद्यस्थितीत शेतकऱ्यांना उभं करण्याबरोबरच मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये, यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. मराठवाड्यात, हॉटेल भाग्यश्रीचे नागेश मडके यांनी पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना वह्या-पुस्तकांचे वाटप करून मदतीचा हात दिला आहे.

सरकारची मदत अद्याप पूर्णपणे पोहोचली नसली तरी, मराठवाड्यात विविध जाती-धर्माचे लोक एकत्र येऊन मदत करत आहेत, जो एकोप्याचा संदेश देतो. अनेक मुलांची शालेय साहित्य पुरामुळे वाहून गेले आहे, तर काहीजण ओले झालेले पुस्तके सुकवताना दिसतात. धाराशिव येथील तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टने मुख्यमंत्री सहायता निधीत 51 लाख रुपयांची मदत केली आहे.

शिर्डीच्या साईबाबा संस्थानने 1 कोटी, शेगावच्या गजानन महाराज संस्थानने 1 कोटी 11 लाख, तुळजापूर मंदिर संस्थानने 1 कोटी, तर मुंबईतील लालबाग राजा मंडळाने 50 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रातील संत-महंत आणि मठांकडूनही पूरग्रस्तांसाठी मदतीची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Published on: Sep 29, 2025 11:45 AM