Maharashtra BIG Decisions : घरांपासून नोकऱ्यांपर्यंत… महाराष्ट्राचे दमदार महानिर्णय, हा व्हिडीओ चुकवू नका
महाराष्ट्रात पोलीस दलात १५००० पदांची भरती, बीडीडी पुनर्विकासाअंतर्गत घरांचे वाटप आणि नागपूरच्या रघुजीराजे भोसले यांची तलवार लंडनहून महाराष्ट्रात परत आणण्याच्या निर्णयांची घोषणा करण्यात आली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील कामांनाही गती देण्यात येणार आहे. हे सर्व महत्त्वाचे निर्णय महाराष्ट्रासाठी फायदेशीर ठरतील.
महाराष्ट्र सरकारने नुकतेच काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. ज्यामध्ये पोलीस भरतीपासून बीडीडी चाळ पुनर्विकास योजना, मुंबई-गोवा महामार्ग आणि नागपूरच्या भोसले घराण्याची तलवार परत आणणे यासारख्या निर्णयाचा समावेश आहे.
पोलिस भरती – राज्य सरकारने पोलिस दलात सुमारे १५,००० शिपायांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, २०२२ आणि २०२३ मध्ये वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही या भरतीसाठी अर्ज करण्याची संधी मिळणार आहे.
बीडीडी चाळ पुनर्विकास योजना – बीडीडी चाळ पुनर्विकास योजनेअंतर्गत, ५५६ सदनिकांच्या चाव्या त्यांच्या हक्कदार नागरिकांना सोपवण्यात आल्या आहेत.
मुंबई-गोवा महामार्ग – मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम लवकर पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नागपूरच्या भोसले घराण्याची तलवार – एक ऐतिहासिक घटना म्हणून, नागपूरच्या रघुजीराजे भोसले यांची जवळपास २०० वर्षे जुनी तलवार लंडनमधून महाराष्ट्रात परत आणण्यात आली आहे. राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या प्रयत्नांमुळे ही तलवार मायदेशी परत आली. यासाठी मुदुजीराजे भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

