महायुतीत मोठा राजकीय स्फोट होणार? बाळासाहेब थोरातांचा मोठा दावा
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी महायुती सरकारमध्ये "प्रचंड खदखद" असल्याचे म्हटले आहे, तसेच "मोठा राजकीय स्फोट" होण्याची शक्यता वर्तवली आहे. एकनाथ शिंदे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याविरोधात अमित शाहांकडे तक्रार केल्याने महायुतीतील अंतर्गत वाद समोर आला आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुतीमध्ये अंतर्गत खदखद सुरू असून, लवकरच “मोठा राजकीय स्फोट” होणार असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. त्यांच्या मते, महायुतीमधील घटक पक्षांमधील वाद विकोपाला गेले आहेत आणि ही तर फक्त सुरुवात आहे. मुंबई महानगरपालिका निवडणूक 2025 पूर्वीच हे मोठे राजकीय बदल अपेक्षित आहेत.
या अंतर्गत तणावाचे ताजे उदाहरण म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्याकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात केलेली तक्रार. रवींद्र चव्हाण यांच्यामुळे महायुतीत “मिठाचा खडा” पडत असून, त्यांनी पक्षप्रवेशासाठी पैशाचा गैरवापर केल्याचा तसेच बंडखोरांना आर्थिक पाठबळ दिल्याचा आरोप शिंदेंनी केला. डोंबिवलीत शिंदेंच्या शिवसेनेचे चार नगरसेवक चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये सामील झाल्यानंतर शिंदेंच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला होता. शिंदेंनी अमित शाहांना माध्यमांमध्ये बोलणाऱ्या नेत्यांना समज देण्याची मागणीही केली.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन

