दहशतवाद भगवा कधीच नव्हता..; मालेगाव बॉम्बब्लास्टवर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयाने मालेगाव भिक्कू चौकातील २००८ च्या बॉम्बस्फोट प्रकरणात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरसह आठही आरोपींना पुराव्याच्या अभावामुळे निर्दोष मुक्त केले आहे. न्यायालयाने स्पष्ट केले की, संशयावरून शिक्षा देता येत नाही. या निर्णयावर राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्विट करून दहशतवादाचा भगवाशी संबंध नाकारला, तर भाजप नेते मुनगंटीवार यांनी पुरेश्या पुराव्यांच्या अभावावर निषेध व्यक्त केला.
मालेगावच्या भिक्कू चौकात 29 सप्टेंबर 2008 रोजी झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात मुंबईच्या विशेष एनआयए न्यायालयाने आज महत्त्वपूर्ण निकाल जाहीर केला. पुराव्यांच्या अभावी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासह आठही आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. न्यायालयाने स्पष्ट केले की, केवळ संशयाच्या आधारे कोणालाही शिक्षा देता येणार नाही. या निकालानंतर विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी आपली पहिली प्रतिक्रिया ट्वीटद्वारे व्यक्त केली. ते म्हणाले, “दहशतवाद भगवा कधीच नव्हता, नाही आणि यापुढेही कधीही असणार नाही.” दुसरीकडे, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही यावर भाष्य केले. ते म्हणाले, “जर तत्कालीन सरकारने त्या वेळी पुरेसे आणि ठोस पुरावे सादर केले असते, तर गुन्हेगारांची सुटका झाली नसती.”
आता मुंबई-पुणे प्रवास सुसाट! अर्ध्या तासाची बचत, आज होणार मिसिंग लिंक
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून ठिकठिकाणी ध्वजारोहण करत....
एअरबॅगमुळे भाजप खासदार सावरांचा थोडक्यात जीव वाचला, घोडबंदर रोडवर भीषण
नंदनवनवर भेट, राजकारणात खळबळ, परांजपे शिंदे गटाच्या वाटेवर?

