Manoj Jarange Patil : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करा, नाहीतर… जरांगे पाटलांचा सरकारला अल्टिमेटम
मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास राजकीय नेत्यांना राज्यात फिरू देणार नाही, निवडणुका व सभा घेऊ देणार नाही असा इशारा त्यांनी दिला.
मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास गंभीर परिणामांचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांना मदत न केल्यास राज्यात कोणत्याही राजकीय नेत्याला फिरू दिले जाणार नाही, असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करणे आवश्यक असून, यात शेतीला नोकरीचा दर्जा देणे आणि शेतीमालाला हमीभाव देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जरांगे पाटील यांनी ही लढाई अत्यंत टोकाची आणि मोठी असल्याचे सांगितले.
पुढे जरांगे म्हणाले की, आतापर्यंतच्या दोनशे-चारशे वर्षांत शेतकऱ्यांना मिळाला नसेल, असा मोठा न्याय मिळवून देण्याचा त्यांचा निर्धार आहे. या लढ्यात प्रत्येक घरातून एक-दोन शेतकऱ्यांनी कायम साथ देण्याचे आवाहन त्यांनी केले. जर दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर त्यानंतर राज्यव्यापी बैठक घेऊन सरकारला निवडणुका आणि सभा घेऊ दिल्या जाणार नाहीत. प्रसंगी महाराष्ट्रात कोणत्याही राजकीय नेत्याला राहू दिले जाणार नाही, असा सज्जड इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.
Published on: Oct 03, 2025 05:52 PM
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
