AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Abdul Sattar: मराठा आरक्षणावर अब्दुल सत्तारांचे मोठे विधान; जरांगेंना चर्चेतून न्याय देणार

Abdul Sattar: मराठा आरक्षणावर अब्दुल सत्तारांचे मोठे विधान; जरांगेंना चर्चेतून न्याय देणार

| Updated on: Aug 22, 2026 | 2:51 PM
Share

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, चर्चा आणि समन्वयातून मराठा आरक्षणावर तोडगा काढला जाईल. मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची काळजी व्यक्त करत, सत्तारांनी सरकार जरांगे पाटलांच्या मागणीला सहानुभूतीपूर्वक न्याय देईल अशी ग्वाही दिली.

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा आरक्षणाच्या मागणीवर मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करून योग्य तो मार्ग काढतील. सत्तारांनी व्यक्त केलेल्या विश्वासानुसार, जरांगे पाटील यांच्या मताशी अनेक गोष्टींमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सहमत आहेत. कुठेतरी गैरसमज निर्माण झालेला असून तो दूर करून मनोज जरांगे पाटील यांच्या प्रत्येक शब्दाला सन्मानपूर्वक न्याय दिला जाईल. सत्तार यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीबद्दलही चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, जरांगे पाटलांची तब्येत राज्यासाठी फार महत्त्वाची आहे.

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपोषण करणे त्यांच्या तब्येतीसाठी घातक ठरू शकते. सरकारची सहानुभूती दादांच्या सोबत असून समाजावर झालेला अन्याय दूर करण्याचे काम सरकारच करेल. ओबीसी समाजावर कोणताही अन्याय न करता मराठा समाजाला न्याय दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. चर्चेतूनच या प्रश्नाचा मार्ग निघेल, असे सत्तारांनी स्पष्ट केले.

Published on: Aug 22, 2026 02:51 PM

Follow Us