AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातल्या दुष्काली पट्ट्यात मुसळधार; काय आहे परिस्थिती?

मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातल्या दुष्काली पट्ट्यात मुसळधार; काय आहे परिस्थिती?

| Updated on: Sep 21, 2025 | 3:12 PM
Share

मराठवाड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात पुराची स्थिती निर्माण झाली असून, शेती पिके वाहून गेली आहेत. रस्ते आणि पूल पाण्याखाली गेले आहेत.

मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पूर आले आहेत. बीड-खरवंडी महामार्गाचे काम रखडल्याने पर्यायी मार्गही पाण्याखाली गेला आहे. अहिल्या नगरच्या पाथर्डी तालुक्यातील शेरापूर गावात दोन तासांच्या मुसळधार पावसामुळे शेतीची जमीन वाहून गेली आहे आणि एक तरुणही वाहून गेला आहे. लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातही मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे बीड जिल्ह्यात चार लाख वीस हजार हेक्टरपेक्षा जास्त पिकांचे नुकसान झाले असून, नांदेड जिल्ह्यातही सोळा लाख एकवीस एकरावरच्या पिकांचे नुकसान झाले आहे. सातारा जिल्ह्यातही जोरदार पाऊस पडून येरळा नदीला पूर आला आहे. पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत.

Published on: Sep 21, 2025 03:12 PM