मुंबईकरांसाठी मोठी बातमी… मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सकाळीच प्रवाशांना मनस्ताप, कुठं बिघाड?
कल्याण डोंबिवली रेल्वे स्थानकावर चाकरमान्यांची मोठी गर्दी झाली होती. सकाळी ऑफिसला जाण्याची वेळ असल्याने प्रवाशांचा मोठा खोळंबा झाल्याने त्यांच्यात नाराजीचा सूर दिसतोय. आज मंगळवारी सकाळी ७.३० ते ८ च्या सुमारास तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला.
मुंबईकरांसाठी मोठी बातमी आहे. आठवड्याच्या दुसऱ्याच दिवशी पुन्हा एकदा मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती समोर येत आहे. टिटवाळा ते सीएसएमटीला जाणाऱ्या ट्रेन 20 मिनिटे उशीराने धावत आहेत. तांत्रिक कारणामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याचे सांगितले जात आहे. यामुळे कल्याण डोंबिवली रेल्वे स्थानकावर चाकरमान्यांची मोठी गर्दी झाली होती. सकाळी ऑफिसला जाण्याची वेळ असल्याने प्रवाशांचा मोठा खोळंबा झाल्याने त्यांच्यात नाराजीचा सूर दिसतोय. आज मंगळवारी सकाळी ७.३० ते ८ च्या सुमारास तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला. टिटवाळा ते सीएसएमटी दरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील सर्वच ट्रेन १५ ते २० मिनिटे उशीराने धावत असल्याने सकाळी ऑफीसच्या दिशेने निघालेल्या नागरिकांन मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे. अशातच ठाणे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ समोरील जाहिरात फलकाला आग लागल्याने तिथे प्रवाशांची गर्दी झाली होती. आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने धाव घेतली आणि ही आग विझवण्यात त्यांना यश मिळालं. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम

