Sanjay Raut Uncut PC | हा राजकीय-सामाजिक अपराध; मुंबई निधी वाटपावरून राजकारण तापलं, संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
मुंबई महानगरपालिकेतील विकास निधी वाटपावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले असून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. राऊत यांच्या म्हणण्यानुसार, विकास निधी वाटपात मोठा पक्षपात केला जात असून विरोधी पक्षातील नगरसेवक आणि लोकप्रतिनिधींना निधीपासून वंचित ठेवले जात आहे.
मुंबई महानगरपालिकेतील विकास निधी वाटपावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले असून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. राऊत यांच्या म्हणण्यानुसार, विकास निधी वाटपात मोठा पक्षपात केला जात असून विरोधी पक्षातील नगरसेवक आणि लोकप्रतिनिधींना निधीपासून वंचित ठेवले जात आहे. ठाकरे गटाच्या नगरसेवकांना केवळ 2 लाख रुपयांचा निधी दिला जात आहे, तर शिंदे गटाच्या नगरसेवकांना 20 कोटी, 50 लाख, 25 लाख अशा मोठ्या रकमा देण्यात येत आहेत. “विरोधी पक्षाच्या खासदारांना महाराष्ट्रात अजिबात विकास निधी दिला जात नाही, हा एक राजकीय आणि सामाजिक अपराध आहे,” असे राऊत यांनी म्हटले. तसेच त्यांनी तीव्र शब्दांत प्रश्न उपस्थित करत “तुमच्या बापाच्या खिशातले पैसे आहेत का?” असा सवालही केला. याच मुद्द्यावर बोलताना राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. त्यांच्या मते, फडणवीसांना राष्ट्रीय स्तरावर मोठी भूमिका बजावायची असल्यास संकुचित राजकारण सोडून सर्वांना समान न्याय देण्याची भूमिका स्वीकारावी लागेल. “मी सगळ्यांचा आहे, लोकशाही मानतो, त्यामुळे विरोधी पक्षालाही समान विकास निधी मिळायला हवा,” अशी भूमिका त्यांनी मांडली. तसेच, सध्याची राजकीय स्थिती पाहता केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी असे पर्यंतच फडणवीसांचे राजकीय अस्तित्व टिकेल, असेही ते म्हणाले. या वक्तव्यांमुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हा राजकीय-सामाजिक अपराध; मुंबई निधी वाटपावरून राजकारण तापलं
ठाकरे गटात फूट पडणार? ऑपरेशन टायगरवर राऊतांचा जोरदार पलटवार
महाराष्ट्रात ही पद्धत कधीच नव्हती, विजय वडेट्टीवार संतापले
बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; तरी बारामतीत मतदान होणार?

