AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरे उमेदवार नसल्याने मविआत नाराजी, भाजप या नाराजीचा घेणार फायदा? नेमकं काय घडणार?

उद्धव ठाकरे उमेदवार नसल्याने मविआत नाराजी, भाजप या नाराजीचा घेणार फायदा? नेमकं काय घडणार?

| Updated on: Apr 29, 2026 | 5:20 PM
Share

राज्यातील विधानसभा निवडणुकीबाबत गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता महाविकास आघाडीकडून अंबादास दानवे यांनाव समोर आलं आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकीबाबत गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता महाविकास आघाडीकडून अंबादास दानवे यांनाव समोर आलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे हे विधानपरिषदेवर जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. विरोधी पक्षाचीदेखील तीच इच्छा होती. मात्र आता महाविकास आघाडीत ताळमेळ बसला नसल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळेच काँग्रेसही स्वतःचा उमेदवार देणार असल्याची चर्चा रंगली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मविआतील या नाराजीनाट्याचा फायदा भाजपला होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजप विधान परिषदेसाठी अतिरिक्त उमेदवार देणार का या चर्चांना उधाण आलं आहे. ठाकरे उमेदवार नसल्यामुळे मविआमध्ये उलथापालथ पाहायला मिळतेय, तर दुसरीकडे भाजप केंद्रीय पातळीवर चर्चा करणार असल्याची नवीन माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

Published on: Apr 29, 2026 05:20 PM
Follow Us